ज्ञानियांचा राजा
संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!
श्रवणाची पर्वणी
तेव्हा ईश्वर आपल्यातच आहे, हे परमपूज्य श्रीजींनी निर्देशित केले. परमपूज्य श्रीजींनी ईश्वराची जीवनामधील गरज हा विषय एक वेगळ्या दृष्टिकोनातून समजावून दिला. ईश्वराचे रूप हे त्रिविध प्रकारचे (आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक) आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी नवीनच होता. वरील त्रिविध प्रकार, त्रिविध तापांचे असतात हे माहीत होते. परंतु, ईश्वराचे स्वरूपही याच प्रकारचे आहे, हे विचारांना चालना देणारे ठरले.
पूर्ण गुरुकृपा फल हे
त्यानंतर श्री. खत्री यांना केमोथेरपीही देण्यात आली. केमोथेरपी घेतलेल्यांना त्याचे दुष्परिणाम माहित असतीलच. परंतु, पुन्हा एकदा, श्रीप्रभुकृपेने त्यांना केमोथेरपीचे कोणतेही सामान्य दुष्परिणाम जाणवले नाहीत. सुरुवातीला, त्यांच्या खाण्यावर परिणाम झाला होता, परंतु आज, शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ एक वर्षानंतर, श्री. राज खत्री आपले सामान्य जीवन जगत आहेत. तीन महिन्यांपूर्वी, त्यांना कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अडवाणी यांनी श्री. राज आता कर्करोगमुक्त झाल्याचे सांगितले. हा एक अद्भुत चमत्कारच होता आणि श्री प्रभुच्या असीम कृपेने नुकत्याच पार पडलेल्या श्री दत्त जयंती सोहळ्यातही ते उत्साहाने सहभागी होऊ शकले.
श्रीप्रभु समाधीचा हार
आजही ते वाक्य कानाभोवती रूंजी घालत आहे. मनाच्या भेदरलेल्या अवस्थेत भेटलेल्या बाबांचा किंवा त्यांच्या धीरोदात्त वाक्यांचा अर्थ त्यावेळी लक्षात आला नाही, पण आज सगळे स्थिरस्थावर झाल्यावर जाणवते आहे की श्रीप्रभु आपल्या भक्तांच्या सदैव कशाप्रकारे बरोबर असतात. ह्या सर्व प्रसंगातून सुखरुप वाचवल्याबद्दल मनोमन श्रीप्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतानाच, पत्नी देवघरात म्हणत असलेल्या श्रीसिद्धाराज प्रभुंच्या पंक्ती कानावर पडत होत्या…
जय जय हो सकलमता विजय हो
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मंगळवार दि.२६/१२/२०२३ ला श्री माणिक प्रभू जयंती दिनी सायंकाळी ७.३० वा सगरोळीहून माणिक नगर साठी निघालो गाडीच्या ड्रायवर ने २ वेळा जिवावरचे अपघात केले होते. मनातून धाकधूक होतीच. आम्ही भालकी ते हुमानाबाद्च्या रस्त्यावर असताना अंदाजे रात्री १०.३० च्या सुमारास हाइवे वर एक वळण होते व त्या वळणावरच ट्रक उभा असलेला ड्रायवरला नीट दिसला नाही आणि गाडी ९० ते १०० च्या वेगात, अगदी जवळ येताच त्याच्या लक्षात आले. आणि त्याने प्रसंगावधान राखून झटकन गाडी उजवीकडे वळवून परत डावीकडे वळणावर घेतली. केवळ एका क्षणाच्या १०० व्या भागाच्या वेळेतच हे घडून गेले. गाडी पुन्हा डावीकडे सरळ करताना त्या वेगात सावरले गेले, नाही तर उजवीकडे-डावीकडे वळविण्याच्या प्रयत्नात गाडीने पलटी खाल्ली असती. श्री प्रभू कृपा म्हणूनच आम्ही बचावलो,नाहीतर आमचे काही खरे नव्हते.
एकमुखी दत्तगुरु
या संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे. प्रभू दरबार. सर्वच दत्तपीठांत दत्तजयंतीचा महोत्सव दणक्यात साजरा केला जातो. माणिक नगरला तर हा महोत्सव १० दिवस चालतो. पण “प्रभू दरबार” म्हणजे “जरा हटके” सोहळा. दत्तजयंतीचा महोत्सव आटोपला की दुसऱ्या दिवशी रात्री श्री माणिक प्रभू महाराजांचा दरबार भरतो. राजवस्त्रे ल्यालेले, नानालंकारमंडीत, छत्र चामरे भूषित, डोक्यावर माणिक प्रभूंची खास ओळख असलेली कलाकुसरीची भरजरी टोपी परिधान केलेले राजयोगी संतवर्य प्रभू महाराज; रात्री दरबारातील प्रभू गादीवर विराजमान झाले की प्रभू दरबार सुरू होतो. विशेष म्हणजे दरबारात आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रभू महाराज स्वहस्ते प्रसाद देतात. शेवटच्या भक्ताला प्रसाद दिला की प्रभू महाराज गादीवरून उठतात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी भरणारा प्रभू दरबार हे माणिक प्रभू महाराजांच्या सकलमत संप्रदायाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Recent Comments