सप्टेंबर २००९ मध्ये अनंत चतुर्दशी च्या २/३ दिवस आधी मी, सौ .स्वाती मोहिले , श्रीरंग चौबळ व सौ .स्मिता अचानक ठरवून माणिकनगरला गेलो. तसे प्रयोजन उत्सव वगैरे काहीच नव्हते. या आधी गणपती काळात कधीही माणिकनगरला गेल्याचे आठवत नाही. गुलबर्गा येथे पोहोचून तेथून return taxi करुन माणिकनगरला गेलो कारण त्याच दिवशी रात्रीच्या हुसैनसागर एक्सप्रेसनी परत निधणार होतो. तसे 3rd AC चे booking पण होते. कां कोणास ठाऊक पण माणिकनगर एकदम शांत भासत होते.

श्री सिद्धराज महाराजांची प्रकृती बरी नसल्याचे समजले. तरी मी व बाळा आल्याचे कळल्यावर श्रीजींनी आम्हाला आपल्या शयनकक्षातच बोलावून घेतले. झोपूनच आम्हाला चरण दर्शन दिले. आम्ही लगेच निघालो कारण प्रकृती खूपच बरी नव्हती.

आम्ही नेहमीप्रमाणे सर्व देवळात दर्शन घेऊन भंडारखान्यांत प्रसाद घेतला. रात्रीच्या ट्रेननी परतायचे होते म्हणून मंदिर परिसरातच रेंगाळत होतो. सहज संध्याकाळी भक्तकार्य कधी होईल याची चौकशी करता ६ च्या सुमारास होईल असे समजले. बाळा ने मला विचारले आपली ट्रेन कितीची आहे? मी टिकिट पाहून सांगीतले ‘‘18.45 म्हणजे 7.45 pm’’

आम्ही भक्तकार्य करुन जायचे ठरवले व ६ पासून वाट पाहू लागलो परंतु महाराजांना खूप त्रास होत असल्याचे व आत्ताच उलटी झाल्याचे समजले. भक्तकार्य कदाचित्‌ होणार नव्हते. आम्ही महाराजांना निघतो म्हणून निरोप पाठवला. परंतु अचानक श्रीजींनी ‘‘मी येतो, थांबा’’ असा उलट सांगावा पाठवला .

महाराज आले, खूप थकवा जाणवत होता पण फक्त आमच्यासाठी त्यानी भक्तकार्य केले प्रसाद दिला, आम्ही चौघे व १/२ ग्रामस्थ हजर होते.त्या नंतर जुजबी बोलणे झाले मी म्हणालो ‘‘आता मुंबई दौरा करा एकदा’’ तेंव्हा ते गूढ हसत म्हणाले -‘‘आता मुंबई?’’

कां कोणास ठाऊक पण आमचा पायच निघत नव्हता, पोट पिळवटून आले होते, मन विषण्ण झाले होते. शेवटी श्रीजी म्हणाले ‘‘अरे तुमची ट्रेन आहे निघा आता.’’ जड अंत:करणाने निघालो, महाराज बसूनच होते, संगमावरुनही ते आमच्या कडे एकटक पहात असल्याचे आम्हाला जाणवले, आम्हा चौघांतही एक भयाण शांतता होती. ही कसली चाहूल आहे हे कळत नव्हते. शेवटी बाळा ने कोंडी फोडली म्हणाला ‘‘आज महाराज काही वेगळेच भासले’’. आम्ही फक्त दुजोरा दिला. त्यातच गुलबर्गा येथे पोहोचलो व किती वाजले ते पाहीले व मी ओरडलोच ‘‘बाळा मी चुकलो 18.45 is 6.45 pm not 7.45 pm आपली ट्रेन गेली.’’ इतक्या वर्षात मी railway time मध्ये कधीही गफलत केली नव्हती कारण तोच माझा व्यवसाय आहे. मग आज हे असे कसे घडले? मी अचंबित झालो .

आता २ बायका मी व बाळा .. and no reservations. सहज main TT कडे गेलो त्यास परीस्थिती सांगीतली तो अचानक म्हणाला मागून chennai exp येते आहे मी ac iii मध्ये 2 berth देतो 2 बर्थ train मध्ये try करा. आम्ही तयार झालो पण चुकलेल्या train चा 50% refund? पैसे फुकट जाणार. तो TC म्हणाला एक काम करा तिकीट मला द्या मी नंतर काउंटर वरुन घेईन तुम्ही मला amount वळती करुन द्या व निघा.

आम्ही पळत 3 no platform वर आलो कारण train आली होती. आता 2 birth and 4 persons. आम्ही coach च्या दारात पोहोचलो तोच train चा tc आला व म्हणाला कीती जण आहात आम्ही सांगीतले 4 persons but only 2 berths we have. तो म्हणाला no problem आत तुमचे जे 2 berth आहेत त्या समोरच्या 2 berth अजून घ्या wadi quota आला नाही. हे सर्व अजब होते. आगाऊ बुकींग करूनही न मिळणारे reservations आयत्या वेळी? Train miss झाल्यावर?

स्वतः आजारी असतानाही श्री सिद्धराज महाराजांनी आमची परतीची सोय मात्र उत्तम केली होती. पण माणिकनगर मधील आजच्या दिवसातील घडामोडींचा व आमच्या मनातील घालमेली चा खरा अर्थ आम्हाला नंतर कळला. कारण….. ते आमचे श्री सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे अखेर चे दर्शन होते.

आमचे कारणाशिवाय अचानक माणिकनगर ला जाणे (जणू महाराजांनीच भेटायला बोलावून घेतले). श्री सिद्धराज महाराजांचे अखेरचे दर्शन व महाराजांकडून शेवटचा प्रसाद मिळणे. train चुकून ही विनासायास reservations मिळणे हे सर्व आमच्या वरील श्री सिद्धराज महाराजांचे प्रेम व अखंड आशीर्वाद या शिवाय शक्यच नव्हते. महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठी सदैव आहेतच, पण ते आमच्यापाठी आहेत, याची जाणीव सतत होत रहावी, हीच त्यांच्या चरणीं प्रार्थना.

[social_warfare]